दिल्लीत ‘स्वच्छ पाणी अभियान’चा शुभारंभ :
दिनांक 4 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांनी नागरिकांना सुरक्षित पेयजल उपलब्ध व्हावे या हेतूने ‘स्वच्छ पाणी अभियान’ राबवविण्यास सुरुवात केली आहे. प्रारंभी हे अभियान दिल…
- दिनांक 4 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांनी नागरिकांना सुरक्षित पेयजल उपलब्ध व्हावे या हेतूने ‘स्वच्छ पाणी अभियान’ राबवविण्यास सुरुवात केली आहे. प्रारंभी हे अभियान दिल्ली क्षेत्रात राबवविले जाणार आहे आणि हळूहळू ते राष्ट्राव्यापी करण्याची योजना आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आरंभ करण्यात आलेले 'स्वच्छ भारत अभियान' आणि 2024 सालापर्यंत घराघरात नळाद्वारे पिण्याचे पाणी पोहचविण्याचे ध्येय यांच्या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छ पाणी अभियान' किंवा ‘क्लीन वॉटर मिशन’ हा कार्यक्रम राबवविला जाणार आहे.
प्लास्टिकपासून डांबर तयार करण्यासाठी इंडियन ऑईल कंपनीने पुढाकार घेतला :
- इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या देशातल्या सर्वात मोठ्या सार्वजनिक इंधन विक्रेता कंपनीने एकदाच वापर होणार्या प्लास्टिकच्या कचर्यापासून एक उपयोगी उत्पादन तयार करून सरकारच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
- या उपक्रमानुसार, प्लास्टिकच्या कचर्यापासून डांबर म्हणजेच टार (रस्ते तयार करण्यासाठी वापरला जाणारा चिकट पदार्थ, जो शुद्धीकरणादरम्यान खनिजतेलापासून नैसर्गिकरीत्या प्राप्त होतो) याची निर्मिती केली जाणार आहे.
- फरीदाबाद (हरियाणा) येथे असलेल्या कंपनीच्या एका केंद्रावर यासंबंधीचा प्रायोगिक प्रकल्प तयार करण्यात आला आहे. कंपनी रस्ते बांधकामात डांबरचा वापर करण्यासाठी प्लास्टिकपासून तयार केलेल्या डांबरचा व्यवसायिकपणे पुरवठा करणार आहे.
- प्लास्टिक-निर्मित डांबरचा वापर करून प्रायोगिक तत्त्वावर तयार करण्यात आलेल्या रस्त्याची कार्यक्षमता CSIR-CRRI यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन ऑईलच्या संशोधन विभागाकडून तपासली जात आहे.
भारतातील पहिला प्लास्टिक ते डिझेल रूपांतरण प्रकल्प :
- मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांनी मथुरा, उत्तर प्रदेशमध्ये देशातील पहिल्या प्लास्टिक ते डिझेल रूपांतरण प्रकल्पाचे उद्घाटन केले.
- विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून जेव्हा काही काळापूर्वी ते आले तेव्हा या प्रकल्पाचे मॉडेल प्रात्यक्षिकेसाठी ठेवण्यात आले होते.
- हे मॉडेल आता मथुरा महानगरपालिकेच्या (एमएमसी) ट्रेंचिंग मैदानात पूर्ण प्रमाणात कार्य करीत आहे.
भारताचा चित्रेश नटेशन ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ :
- बटामी (इंडोनेशिया) : बटामी, इंडोनेशिया येथे नुकत्याच झालेल्या ‘आशिया-श्री’ अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताच्या चित्रेश नटेशनने ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ किताबावर मोहोर उमटवली. तर महाराष्ट्राच्या रोहित शेट्टीने ‘आशिया-श्री’ हा बहुमान मिळवला.
- २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान रंगलेल्या या स्पर्धेत भारताने आठ सुवर्ण, सहा रौप्य आणि आठ कांस्यपदके मिळवून एकूण २२ पदकांसह पदकतालिकेत दुसरे स्थान मिळवले. केरळच्या चित्रेशने ९० किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकण्याबरोबरच सर्व गटातील सुवर्णपदक विजेत्यांच्या स्पर्धेतही विजेतेपद मिळवले. महाराष्ट्राच्या रोहितने १०० किलो गटात सुवर्णपदकावर नाव कोरले.
- याव्यतिरिक्त, कुंदन गोपे (५५ किलो), हरीबाबू कृष्णमूर्ती (७० किलो), विजयप्रकाश (७५ किलो), सरबो सिंग (८० किलो), रवीकुमार राव (७५ किलो – कनिष्ठ गट) आणि श्याम सिंग शेरा (दिव्यांग गट) यांनीही भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली.
स्वच्छतेच्या व्याप्तीत २०१४ मधील ३८ टक्क्यांच्या तुलनेत ९८ टक्के वाढ :
- भारतातील स्वच्छतेच्या व्याप्तीत २०१४ मधील ३८ टक्क्यांच्या तुलनेत ९८ टक्के वाढ झाल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी भारताचे कौतुक केले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचे हे यश असून त्याची दाखल आता जागतीक स्तरावरही घेण्यात आली आहे.
- स्वच्छ भारत उपक्रमामुळे स्वच्छतेच्या व्याप्तीत २०१४ मधील ३८ टक्क्यांच्या तुलनेत आता ९८ टक्के वाढ झाली आहे.
- एसईक्यूआयनुसार, देशातील ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९५ टक्के शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे आहेत. २०१६-१७ च्या अहवालानुसार आसाम आणि मेघालयमध्ये अनुक्रमे ८३.४० आणि ८४.१० टक्के सर्वात कमी प्रमाणावर मुलींसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध होती. दरम्यान, बहुतेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मागील वर्षाच्या तुलनेत समान माहिती नोंदविली तर सिक्कीम आणि नागालँडमध्ये घट नोंदली गेली.
No comments