Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

महाराष्ट्रातील पंचायत राज - महत्वाचे प्रश्न

1) कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ? स्थानिक स्वराज्य संस्था

2) राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ? 2 ऑक्टोबर 1953
3)बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी…

1) कोणत्या संस्थांना लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
स्थानिक स्वराज्य संस्था

2)  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
2 ऑक्टोबर 1953

3) बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
16 जानेवारी 1957

4) बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
वसंतराव नाईक समिती

5) वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
27 जून 1960

6) वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
महसूल मंत्री

7) वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
226

8) वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
जिल्हा परिषद

9) पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

10) महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
1 मे 1962

11) ‘महसुली खेड्याची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

12) महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
7 ते 17

13) ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
जिल्हाधिकारी

14) ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
जिल्हाधिकारी

15) ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
5 वर्षे

16) ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?
पहिल्या सभेपासून

17) ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
तहसीलदार

18) सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
विभागीय आयुक्त

19) उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
सरपंच

20) सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
पंचायत समिती सभापती

21) पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
दोन तृतीयांश (2/3)

22) महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
तीन चतुर्थांश (3/4)

23) पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
पंचायत समिती सभापती

24) पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
जिल्हा परिषद अध्यक्ष

25) जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
संबंधित विषय समिती सभापती

26) जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
जिल्हा परिषद अध्यक्ष

27) जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
विभागीय आयुक्त

28) कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
ग्रामसेवक

29) ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
जिल्हा परिषदेचा

30)  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

31) ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
ग्रामसेवक

32) ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

33) ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
राज्यशासनाला

34) सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
विस्तार अधिकारी

35)  गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
ग्रामविकास खाते

36) जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
जिल्ह्याचे पालकमंत्री

37) जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
जिल्हाधिकारी

38) जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
दहा (स्थायी+9 विषय समित्या)

39) जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?
स्थायीकृषी,समाजकल्याणशिक्षणबांधकामवित्तआरोग्यपशुसंवर्धन व दुग्धविकासमहिला व बालकल्याणजलसंधारण व पेयजल पुरवठा

40) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
जिल्हा परिषद अध्यक्ष

41) महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
वसंतराव नाईक

No comments