Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे (Part-1)

महाराष्ट्रातील नेवासे,चांदोली,सोमगाव,टेकवाडे,सावरदे व दायमाबाद इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.महाराष्ट्रातील महापाषाण  युगाचा काळ इ.स.पूर्व 1000 वर्षापूर्वीचा आहे.मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रा…

  • महाराष्ट्रातील नेवासे,चांदोली, सोमगाव,टेकवाडे, सावरदे व दायमाबाद इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.
  • महाराष्ट्रातील महापाषाण  युगाचा काळ इ.स.पूर्व 1000 वर्षापूर्वीचा आहे.
  • मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रात सातवाहन राजघराण्याचा उदय झाला.
  • जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे 'सातवाहनहेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय.
  • 'सिमुकहा राजा सातवाहन घराण्याचा संस्थापक मानला जातो.
  • सातवाहन 'राजा सातकर्णीप्रथम व त्याची रानी 'नागणिकायांची प्रतिमा जुन्नरच्या नाणेघाटात आढळून येते.
  • चालुक्य हे वैष्णवपंथी होतेतरीही त्यांनी धर्मसंहिष्णुतेचे धोरण राबविले होते.
  • इ.स. 753 च्या दरम्यान चालुक्य घराण्याच्या र्हासानंतर 'दंतीदुर्गयाने राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली.
  • राष्ट्रकूट  घराण्यातील 'कृष्ण प्रथमयाने जगप्रसिद्ध असलेले 'वेरूळ येथील कैलास मंदिरबांधले .
  • शिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकणउत्तर कोकण (ठाणे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी सत्ता केंद्रे होती.
  • शिलाहार घराण्याचा संस्थापक म्हणून 'विद्याधर जीमुतवाहनहा असून उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर(तेर) हे त्याचे मूल स्थान होय.
  • चंद्रपुर येथे गोंड घराण्याने आपली सत्ता निर्माण केली तसेच या घराण्याचा संस्थापक 'कोल भिलहा होता.
  • यादवांचा प्रधान हेमाद्री याने 'चातुरवर्ग चिंतामणीहा ग्रंथ लिहिला.
  • अल्लाउद्दीन खिलजी याने 1296 मध्ये देवगिरीवर स्वारी केली.
  • महाराष्ट्रात बहामणी राज्याची स्थापना 'हसन गंगू बहामणीयाने केली तो या राज्याचा संस्थापक मानला जातो.

बहामणी राज्याचे पुढील पाच तुकडे झाले -
  • वर्हाडी-इमादशाही
  • अहमदनगर-निजामशाही
  • बिदर-बरीदशाही
  • गोवलकोंडा-कुतुबशाही
  • विजापूर-आदिलशाही

  • विजापूरची आदिलशाही राज्याची युसुफ अदिलशाह याने 1489 मध्ये स्थापना केली.

No comments