Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे

महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे महाराष्ट्रातील नेवासे, चांदोली, सोमगाव, टेकवाडे, सावरदे व दायमाबाद इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.महाराष्ट्रातील महापाषाण युगाचा काळ इ.स.पूर्व 1000 वर्षापूर्वीचा आ…

महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे
  • महाराष्ट्रातील नेवासेचांदोलीसोमगावटेकवाडेसावरदे व दायमाबाद इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.
  • महाराष्ट्रातील महापाषाण युगाचा काळ इ.स.पूर्व 1000 वर्षापूर्वीचा आहे.
  • मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रात सातवाहन राजघराण्याचा उदय झाला.
  • जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे सातवाहन’ हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय.
  • सिमुक’ हा राजा सातवाहन घराण्याचा संस्थापक मानला जातो.
  • सातवाहन राजा सातकर्णी’ प्रथम व त्याची रानी नागणिका’ यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणेघाटात आढळून येते.
  • चालुक्य हे वैष्णवपंथी होतेतरीही त्यांनी धर्मसंहिष्णुतेचे धोरण राबविले होते.
  • इ.स. 753 च्या दरम्यान चालुक्य घराण्याच्या र्हासानंतर दंतीदुर्ग’ याने राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली.
  • राष्ट्रकूट घराण्यातील कृष्ण प्रथम’ याने जगप्रसिद्ध असलेले वेरूळ येथील कैलास मंदिर’ बांधले .
  • शिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकणउत्तर कोकण (ठाणे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी सत्ता केंद्रे होती.
  • शिलाहार घराण्याचा संस्थापक म्हणून विद्याधर जीमुतवाहन’ हा असून उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर (तेर) हे त्याचे मूल स्थान होय.
  • चंद्रपुर येथे गोंड घराण्याने आपली सत्ता निर्माण केली तसेच या घराण्याचा संस्थापक कोल भिल’ हा होता.
  • यादवांचा प्रधान हेमाद्री याने चातुरवर्ग चिंतामणी’ हा ग्रंथ लिहिला.
  • अल्लाउद्दीन खिलजी याने 1296 मध्ये देवगिरीवर स्वारी केली.
  • महाराष्ट्रात बहामणी राज्याची स्थापना हसन गंगू बहामणी’ याने केली तो या राज्याचा संस्थापक मानला जातो.

बहामणी राज्याचे पुढील पाच तुकडे झाले :
वर्हाडी – इमादशाही
अहमदनगर – निजामशाही
बिदर – बरीदशाही
गोवलकोंडा – कुतुबशाही
विजापूर – आदिलशाही

  • विजापूरची आदिलशाही राज्याची युसुफ अदिलशाह याने 1489 मध्ये स्थापना केली
  • गुरु नानक’ हे शीख धर्माचे संस्थापक मानले जातात.
  • गुरु गोविंदसिंग नांदेड मध्ये मुक्कामी असताना इ.स.1708 मध्ये दोन पठाणांकडून त्यांची हत्या झाली.
  • 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
  • 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली.
  • 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
  • 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले.
  • 1761 मध्ये तिसरे पानीपतचे युद्ध घडून आले.
  • 1802 मध्ये इंग्रज आणि मराठे यांच्यात वसईचा तह होऊन मराठ्यांनी तैनाती फौज स्वीकारली.
  • शिवाजी महाराजांनी जमीन मोजण्यासाठी एक काठी तयार केली होती तिला शिवशाही काठी’ असे म्हटले जात असे.
  • शिवाजी महाराजांनी दोन नाणी सुरू केली होती त्यामध्ये होन’ हे सोन्याचे तर शिवराई’ हे तांब्याचे नाणे होते.
  • दक्षिण भारतामध्ये नायनार आणि अलवार’ या भक्ती चळवळी उदयास आल्या.
  • महाकवी सूरदास यांनी सुरसागर’ हे काव्य लिहिले.
  • शिलाहार राजे प्रथम राष्ट्रकूटाचे व नंतर चालुक्य व यादवांचे अंकित झाले. चालुक्य राजा दुसर्‍या पुलकेशीने आपला मुलगा चंद्रादित्य यास सामंत म्हणून 630 च्या सुमारास नेमले व चांदोर सध्याचे चंद्रपुर ही आपली राजधानी बनवली.
  • 23 जून 1757 च्या प्लासीच्या युद्धात बंगालच्या नवाबचा पराभव करून ब्रिटीशांनी बंगालमध्ये आपली सत्ता निर्माण केली.
  • 1818 मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.
  • ग्रजांनी उमाजी नाईकांच्या विरोधात पहिला जाहीरनामा 1826 साली काढला.
  • उमाजी नाईक व त्याचा साथीदार पांडुजी याला पकडण्यासाठी रु.100/- चे बक्षीस जाहीर केले.
  • उमाजी नाईकांचा जुना शत्रू बापुसिंग परदेशी याने इंग्रजांना सहकार्य करून नाईकांना पकडून देण्यास मदत केली. काळू व नाना यांनी विश्वासघाताने उमाजीला पुण्याच्या मुळशीजवळ अवळसा येथे आणून पकडून देण्यास मदत केली.
  • नानाने उत्तोळी येथे 15 डिसेंबर 1831 रोजी उमाजीला पकडले आणि इंग्रजांच्या स्वाधीन केले.
  • 3 फेब्रुवारी 1834 रोजी उमाजी नाईकला फाशी देण्यात आली.
  • कोळी जातीच्या लोकांनी 1828 मध्ये मुंबई विभागात ब्रिटिशांविरोधी रामजी भांगडि याच्या नेतृत्वाखाली उठाव केला.
  • पुणे जिल्ह्यात 1839 मध्ये कोळी जमातीच्या लोकांनी उठाव केला.
  • ब्रिटिश राजवटीविरुद्ध सर्वात मोठा उठाव म्हणून 1857 च्या उठावाकडे पाहिले जाते.
  • स्वातंत्र्य वीर सावरकरांनी 1857 च्या उठावास  पहिले स्वातंत्र्य समर असे म्हटले आहे. तर इतिहासकार न.र. फाटक यांनी शिपायांची भाऊगर्दी असे संबोधिले आहे.
  • सातार्‍याचे छत्रपती प्रतापसिंग यांचे गेलेले राज्य परत मिळण्यासाठी रांगो बापुजी यांनी 1857 च्या उठावाच्या वेळी खूप प्रयत्न केले.
  • 1857 च्या उठावाच्या वेळी 31 जुलै 1857 रोजी कोल्हापुरात इंग्रजांविरुद्ध उठाव झाला.
  • नाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी कोळ्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला यामध्ये पेठचा राजा भगवंतराव नीलकंठ राव हा प्रमुख होता.
  • 13 जून 1957 रोजी नागपूरमधील लोकांनी 1857 च्या उठावात भाग घेवून इंग्रजांविरुद्ध उठाव केला.
  • 1857 साली महाराष्ट्रात पुणे व अहमदनगर जिल्ह्यामध्ये दख्खनचे दंगे घडून आले. हे दंगे म्हणजे शेतकर्‍यांनी सावकार विरुद्ध केलेले उठाव होत.
  • वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर,1845 रोजी कुलाबा जिल्ह्यातील सिरधोण’ येथे झाला.
  • गणेश वासुदेव जोशी यांनी समाजामध्ये ऐक्य ,समन्वय निर्माण व्हावा म्हणून ऐक्यवर्धणी’ ही संस्था स्थापन केली. व त्याच वेळी पुण्यात 1874 ‘पुना नेटीव्ह इन्स्टिट्यूशन’ ही शाळा सुरू केली.
  • 20 फेब्रुवारी1889 नंतर वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशीकोळीमहार आणि मुसलमान इत्यादी लोकांच्या मदतीने पुणे जिल्ह्याच्या परिसरात दरोडे घालण्यास सुरुवात केली.

No comments