Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 21 July 2019

हिमा दासला पाचवे सुवर्णपदक : भारताची अव्वल धावपटू हिमा दास हिचा सुवर्णपदकांचा धडाका सुरूच असून शनिवारी तिने पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. मेटूजी ग्रां. प्रि. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत …

हिमा दासला पाचवे सुवर्णपदक :
  • भारताची अव्वल धावपटू हिमा दास हिचा सुवर्णपदकांचा धडाका सुरूच असून शनिवारी तिने पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. मेटूजी ग्रां. प्रि. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ५२.०९ सेकंद अशा वेळेसेह सुवर्णपदक पटकावले.
  • गेल्या १५ दिवसांत २०० मीटर शर्यतीत चार सुवर्णपदके पटकावणाऱ्या हिमाने ४०० मीटर शर्यतीत पहिल्यांदाच धावत या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या शर्यतीत भारताच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. व्ही. के. विस्मया हिने ५२.४८ सेकंद अशी कामगिरी करत रौप्यपद पटकावले. सरिताबेन गायकवाड हिने ५३.४८ सेकंदासह कांस्यपदक तर एम. आर. पूवाम्मा हिने ५३.७४ सेकंदासह चौथा क्रमांक प्राप्त केला.
  • पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या नोह निर्मल टॉम याने ४६.०५ सेकंदासह रौप्यपदक पटकावले. कझाकस्तानच्या माझेन अल-यासिन याने ४५.९८ सेकंद अशी कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरुषांच्या २०० मीटर शर्यतीत मोहम्मद अनास याने २०.९५ सेकंदासह रौप्यपदक जिंकले.

मुकेश अंबानीना ११ वर्षांपासून एक रूपयाही नाही पगारवाढ :
  • देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी सलग ११ व्या वर्षी १५ कोटी रुपये वार्षिक वेतन घेण्याचा क्रम राखला आहे. कंपनीच्या २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्रकंपनीतील सहकाऱ्यांचा पगार २० कोटींच्या घरात गेला आहे.
  • फोर्बसच्या यादीत नेहमीच आघाडीचा क्रम राखणारे अंबानी हे देशातील निवडक श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. अंबानी यांनी २००८-९ या वर्षापासून आपले वेतनइतर लाभभत्ते आणि कमिशनपोटी १५ कोटी रुपये इतकीच रक्कम कायम ठेवली आहे. तत्पूर्वी त्यांचे वार्षिक वेतन २४ कोटी रुपये इतके होते.
  • मुकेश अंबानी यांचे जवळचे नातेवाईक आणि सहकारी निखील मेसवानी आणि हितल मेसवानी यांच्यासह अन्य पूर्णवेळ संचालकांना मोठी पगारवाढ देण्यात आली आहे. निखील आणि हितल मेसवानी यांचा वार्षिक पगार २० कोटी ५७ लाख झाला आहे. मुकेश अंबानी यांच्या वेतनामध्ये चार कोटी ४९ लाख पगार भत्ता९ कोटी ५७ लाखांचे कमिशन आणि अन्य सुविधांसाठी २७ लाख रूपयांचा समावेश असल्याचे बैठकीत सांगितले.

चांद्रयान-२ मोहिमेची सर्व तयारी पूर्णसोमवारी दुपारी होणार प्रक्षेपण :
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-२ मोहिमेच्या प्रक्षेपणाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. रविवारी संध्याकाळपासून याच्या काऊंटडाऊनला सुरुवात होणार आहेत्यानंतर नव्या वेळेप्रमाणेसोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान-२ चे प्रक्षेपण होणार आहे.
  • इस्रोचे प्रमुख डॉ. सिवन यांनी सांगितले की१५ जुलै रोजी चांद्रयान-२च्या प्रक्षेपणात आलेल्या तांत्रिक अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत. गेल्या शनिवारी इस्रोने चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणासाठीचे यान जीएसएलव्ही मार्क ३ एम१ ची तालीमही पूर्ण केली आहे. यावेळी त्याच्या कामगिरीत कुठलीच अडचण आढळून आली नाही. त्यामुळे आता सोमवारी दुपारी २.४३ वाजता चांद्रयान-२ चे प्रक्षेपण होणार आहे.
  • यापूर्वी चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची तारीख १५ जुलै रोजी निश्चित करण्यात आली होती. मात्रआयत्या वेळी काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने शेवटच्या क्षणी या यानाचे प्रक्षेपण थांबवण्यात आले होतेअसा निर्णय घेणेही महत्वाचे होते. या मोहिमेत काम करणाऱ्या वैज्ञानिकांनी सांगितले कीमोठी दुर्घटना होण्याऐवजी या यानाचे प्रक्षेपण थांबवण्यात आले यासाठी इस्रोचे कौतुक करायला हवे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचा प्रदीर्घ काळापासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता :
  • गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईनागपूरऔरंगाबादप्रमाणे कोल्हापुरातही हायकोर्टाचं सर्किट बेंच असावं या मागणीसह कोल्हापूर खंडपीठ कृती समितीने शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदिप नंदराजोग यांची भेट घेतली.
  • तेव्हायावर त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन कृती समितीला दिले आहे. लवकरच अन्य न्यायमूर्तीशी याविषयी सल्लामसलत करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी शिष्टमंडळाला दिले. याप्रक्रियेत काही अडचणीसमस्या असल्या तरी पक्षकारांची सोय आणि खटले लवकरात लवकर निकाली लागणं हाही मुद्दा महत्वाचा आहे.
  • त्यामुळे सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करता या खंडपीठाबाबत गांर्भियाने विचार करण्यात येईलअशी भावना व्यक्त करत मुख्य न्यायामूर्तींनी व्यक्त केली. त्यांच्या या सकारत्मक भूमिकेमुळे आता कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
  • मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद आणि नागपूरप्रमाणे कोल्हापूर खंडपीठही व्हावे या मागणीसाठी मागील 35 वर्षांहून अधिक काळ कोल्हापूरसह सांगलीसातारारत्नागिरीसिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यांचा संघर्ष सुरू आहे. त्या अनुषंगाने शनिवारी कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदरजोग यांच्यात जवळपास  बैठक पार पडली.

No comments